गृहशुद्धी तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यप्राप्ती हे ‘उदकशांत’ करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपण राहत असलेली वास्तू व आपल्या व्यवसायांच्या ठिकाणातील वास्तुमधील नकारात्मक ऊर्जेचा नाश होण्यासाठी उदकशांत दरवर्षी केली जाते. उदक म्हणजे पाणी. या पृथ्वीवर पाण्याशिवाय कोणत्याही गोष्टीचे शुद्धीकरण होऊ शकत नाही. पाण्याला विशिष्ट मंत्रांनी ब्राह्मणद्वारा अभिमंत्रित करून घराचे शुद्धीकरण केले जाते त्याला ‘उदकशांत’ उदकशांत ही कोणत्याही शुभ परिणामासाठी, वास्तूचे मालिन्य दूर करण्यासाठी, सुवेर व सुतक गेल्यानंतर, कोणा व्यक्तीचा तिथीनुसार वाढदिवस साजरा करायचा असेल तर, तीर्थयात्रा करून आल्यावर, क्षेत्रावर त्रिपिंडी श्राद्ध करून आल्यानंतर सहसा केली जाते.
असा हा उदकशांतीचा विधी घरातील वातावरण शुद्ध राहण्यासाठी सर्वांनी दरवर्षी करावा.